मृत्यूला कवटाळताना ची स्थितप्रज्ञता. पायलट सुमित सभरवाल यांची त्यांना मिळालेल्या ४० सेकंदातली समय सूचकता.
संकटाच्या काळात, एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या स्थितीत कधीच गडबडून न जाता मन स्थिर ठेवत स्थितप्रज्ञ, याचा अर्थ आजूबाजूच्या परिस्थितीचा आपल्या मनस्थितीवर कुठलाही एका टोकाचा परिणाम होऊ न देता मन मध्यबिंदूवर स्थिर करत आपण परिस्थितीशी मुकाबला केला पाहिजे, व उद्भवलेल्या समस्येवर आलेल्या संकटावर उत्तमातला उत्तम पर्याय, सोल्युशन आउटपुट काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजेच आपण विचलित न होता स्थितप्रज्ञ अवस्थेला जाण्याचा सल्ला आपल्या महाभारतात भगवान श्रीकृष्ण ने दिला आहे.
अहमदाबाद जवळ झालेल्या एअर इंडियाच्या विमाना ची दुर्घटनेतील मुंबई येथील पवईचे निवासी असलेले पायलट सुमित सभरवाल यांना जेव्हा लक्षात आलं की आता विमान उंचीवर नेणे अशक्य आहे आणि 304 किमी प्रति तासाच्या वेगाने ते जमिनीकडे झेपावत आहे केवळ 600 – 900 फुटाचे अंतर जमिनीशी विमानाच्या टकरावण्याचं बाकी असताना त्यांनी आजूबाजूला नजर फिरवत जिथे कमीत कमी डॅमेज होईल अशा ठिकाणी ते विमान वळवलं तिथे ते विमान पडलं.
मी आता टीव्हीवर विविध चॅनेलवर चर्चा ऐकत आहे त्यातील तज्ञ सांगतात की जर का पायलट सुमित सभरवाल घाबरून जाऊ हडबडाहट मधे या विमानालाला कुठेही, कसेही पडू दिलं असतं तर 25000 अतिशय दाट लोक वस्तीवर हे विमान कोसळलं असतं मृत्यूचा आकडा भयानक राहिला असता.
स्वर्गीय श्री सुमित सभरवाल यांना श्रद्धांजली देतानाच त्यांना आपण प्रणामही केला पाहिजे त्यांच्या या स्थितप्रज्ञ अवस्थेतील निर्णयासाठी.
स्वर्गीय श्री सुमित सभरवाल व सर्व निष्पाप जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली.
प्रा दिनेश सूर्यवंशी