दिनांक : २२ एप्रिल २०२५ | स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे
आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येने जैन समाजाचे नागरिक एकत्र आले आणि मुंबईच्या विले पार्ले येथील बीएमसीकडून पाडण्यात आलेल्या जैन मंदिराच्या निषेधार्थ तीव्र ठिय्या आंदोलन केले. तब्बल दोन तास चाललेल्या या आंदोलनात संपूर्ण परिसर प्रशासन व बीएमसी विरोधातील जोरदार घोषणांनी दणाणून गेला होता. विद्यार्थी, युवक, महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
या आंदोलनात जैन समाजातील चारही प्रमुख संप्रदाय – दिगंबर, श्वेतांबर स्थानकवासी, मूर्तिपूजक आणि तेरापंथी यांनी एकत्रितपणे सहभाग घेतला, हे या आंदोलनाचे वैशिष्ट्य ठरले.
अचल जैन म्हणाले, “ज्यांच्या श्रद्धास्थानांवर हात उठतो, त्यांच्या भावनांना धक्का पोहोचतो. मंदिर पाडणे हा केवळ धार्मिक नव्हे, तर मानवी संवेदनांचा अवमान आहे. आम्ही शांततापूर्ण मार्गाने पण ठामपणे लढा देऊ.”
मिलिंद फडे यांनी सांगितले, आज जैन समाज रस्त्यावर उतरला आहे, हे आपल्या प्रशासनासाठी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. धर्मस्थळांवर घाव घालणे कोणत्याही सरकारला शोभणारे नाही. या आंदोलनाच्या माध्यमातून जैन समाजाने शासनाला स्पष्ट संदेश दिला आहे – धार्मिक स्थळांचा अवमान सहन केला जाणार नाही. शांति आणि अहिंसेच्या मार्गावर चालणारा जैन समाज जेव्हा रस्त्यावर उतरतो, तेव्हा त्यामागे खोल वेदना आणि रोष असतो. Ad अभय छाजेड, माजी नगरसेवक, यांनी सांगितले, “जैन समाज शांतताप्रिय आहे. आम्ही रस्त्यावर येणे ही गोष्टच दुर्मीळ आहे. पण आजचा हा आंदोलन पूर्वनियोजित होता, कारण हे फक्त मुंबईपुरते मर्यादित नाही, तर पालीताना (गुजरात), सम्मेद शिखरजी आणि काही मंदिरांमध्येही अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. मी स्वतः २५ वर्षे नगरसेवक होतो, मला प्रशासनाची कामपद्धती माहिती आहे. त्यामुळे हा प्रकार अत्यंत गंभीर आहे आणि याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.”
शासनाने याकडे गांभीर्याने पाहून दोषींवर कारवाई करावी, ही आंदोलनकर्त्यांची ठाम मागणी होती.
निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती मॅडम यांच्या कडे मागण्यांचा निवेदन देण्यात आले.
यावेळी अचल जैन, मिलिंद फडे, विजयकांत कोठारी, अॅड अभय छाजेड, इंद्र छाजेड, बाळा ओसवाल, प्रविण चोरबोले, युवराज शहा, अक्षय जैन, देवीचंद जैन, राजेश शहा, अजित पाटील, भरत सुराणा, नितीन जैन, बाळासाहेब धोका, अशोक पगारिया, महावीर कटारिया, अभिजीत डुंगरवाल, संदीप भंडारी, सुजाता शहा, योगेश पांडे, सुरेंद्र गांधी, चंद्रकांत पाटील, खुशाली चोरडिया, जिनेन्द्र कावेदिया, संजय नाईक, सुदीन खोत, शीतल लोहाड, उत्कर्ष गांधी, नीलेश शाह, पुष्पा कटारिया, आदी उपस्थित होते.
यावेळी राजकीय पक्षाचे पदाधिकारी सुद्धा सहभागी झाले होते, त्यात अरविंद शिंदे, प्रशांत जगताप, मोहन जोशी, अविनाश बागवे, संगीता तिवारी, सौरभ आमराळे, सौरभ शिंदे, नवाझ सय्यद, आदी उपस्थित होते.